- कराचा निधी पायाभूत सुविधांसाठी वापरा!
राज्यातील महायुती सरकारने ५० टक्के शास्ती माफीसाठी महत्वपूर्ण ऐतिहासिक ‘अभय योजना’ लागू केली. यासाठी आ. अमोल खताळ यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळेच शहरातील नागरीकांना मोठा फायदा होत आहे. तसेच संगमनेर नगरपालिकेला कर वसुलीच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठा निधी उपलब्ध होत आहे. पालिका प्रशासनाकडून या निधीचा उपयोग पायाभूत सुविधांसाठी करण्यात यावा अशी अपेक्षा शिवसेना नगरसेविका सौ. साक्षी सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

अर्थिक वर्ष अखेरीस कर वसुलीसाठी नागरीकांनी केलेले सहकार्य विचारात घेता महायुती सरकाने घेतलेल्या शास्ती माफीचा सकारात्मक परिणाम असल्याचे सांगून नगरसेविका सौ. सूर्यवंशी म्हणाल्या की, आ. अमोल खताळ यांनी नागरीकांना शास्ती माफीचा लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची व्यक्तिगत भेट देवून शास्ती माफीचा निर्णय लागू व्हावा म्हणून विशेष प्रयत्न केले. यामुळे वर्षानुवर्ष नागरीकांवर असलेला कराचा बोजा कमी झाला. पालिका प्रशासनाला वसुलीस नागरिकांनी मोठे सहकार्य केल्याचे नगरसेविका सौ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
पालिकेच्या तिजोरीत कराच्या रूपाने जमा झालेला निधी विकास कामासाठी असून पालिका प्रशासनाने यामाध्यामतून शहरातील पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्याची मागणी सौ.सूर्यवंशी यांनी केली आहे.
महायुती सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आ. अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाला निधीची उपलब्धता होत आहे. शहराच्या विकासात महायुती कुठेही कमी पडणार नाही आशी ग्वाही देवून नागरीकांच्या हक्कासाठी व न्यायासाठी महायुती म्हणून पालिकेत सक्रीयपणे भूमिका बजावणार असल्याचेही यांनी सौ.सूर्यवंशी सांगितले.



