महायुती सरकारने शेतकर्यासाठी सुरू केलेल्या सौर कृषीपंप योजनेचा संगमनेर तालुक्यातील १२ हजार ६४१ शेतकऱ्यांनी सौरकृषी पंपासाठी अर्ज दाखल केले होते त्यापैकी ५ हजार ९०९ शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पैसे भरले होते त्यातून ४ हजार ६४ शेतकरी पात्र ठरलेल्या ३ हजार ३९ सौर कृषी पंप कार्यान्वित झाले असल्याची माहीती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

शेतकर्यांना वीजबीलाच्या कचाट्या तून मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वा खाली महायुती सरकारने सौरउर्जेला प्राधान्य देवून शेतकऱ्यांसाठी सौर कृषी उर्जा पंप योजना कार्यान्वित केली.तालुक्यातील शेतकर्याना या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी विशेष प्रयत्न केले. या योजनेसाठी सादर झालेल्या प्रस्तावांना मान्यता मिळावी यासाठी आ. खताळ यांनी व्यक्तिगत पाठपुरावा केला. त्यामुळे तालुक्या तील ३ हजार ३९ सौर कृषी पंपाना महायुती सरकारने मान्यता दिल्याने सर्व सौर पंप कार्यान्वित झाले आहे.
सौर कृषीपंप सुरू झाल्याने शेतकर्यां वरील वीजबीलाचा भार कमी झाला असून शेतकऱ्याला या योजनेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना महायुती सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाल असल्याचे आमदार .खताळ यांनी सांगितले आहे.



